Friday 2 April 2010

फेकून द्या तो गाऊन... वदली 'जयरामवाणी'!

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5755929.cms

खरंच मला सुध्दा हा प्रश्न नेहमी पडतो की आपल्याला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी अनेक बाबतीत वसाहतवादी मानसिकता आपण टाकून देवू शकलेलो नाही. त्यातीलच एक म्हणजे विद्यापीठातील दीक्षांत समारंभ आणि त्यातील ती गाऊन घालून पदवी स्विकारण्याची पध्दत. त्यानंतर समारंभ संपल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित पणे त्या तिरक्या चौकोनी टोप्या हवेत उडवणे. या सगळ्याचा अर्थ काय आणि याची दिक्षांत समारंभात गरज काय? हे सगळं मी केंब्रिज विद्यापीठात पाहिलं आहे. त्या विद्यापीठात शिकले आणि जेव्हा तिथली पदवी घेतली त्यावेळी त्यांच्या पध्दतीने ती स्विकारण्यात काहीच गैर नाही. या गाऊन ल तिकडे रोब असे म्हणतात. पूर्वीच्या काळी त्यांच्या कडे ख्रिश्चन चर्च चे लोक शिक्षण देत असत. त्यांच्या कडे त्यांचे धर्मगुरू (वेगवेगळ्या स्तराचे) वेगवेगळया रंगाचे गाऊन्स घालत असत. तिच पध्दत पुढे रूढ झाली. पण आपण स्वातंत्र्य मिळाल्यावर तरी या सगळ्याचा विचार करून आपल्या संस्कृतीला साजेशा अश्या पध्दती, पोषाख का शोधूनयेत याचेच आश्चर्य वाटते. आजूनही आपले लोक अनुकरण आणि अंधानुकरण यातील फरक समजू शकत नाहीत हीच खरी शोकांतिका!!

2 comments:

  1. Agree. We are still following old customs w/o any thought. Why do lawyers have to wear black clothes in indian heat ? why do judges have summer holidays ? this was started by british as they cudn't bear the heat and needed to go to a hillstation.

    ReplyDelete
  2. खरय अर्चना तुझं म्हणणं. भारत देश स्वतंत्र होऊन इतकी वर्षे झाली तरी अजुनही भारतीय माणूस स्वतंत्र झालेला नाही.

    ReplyDelete